Friday 18 March 2016

द्वंद्व : स्वतःचं स्वतःशीच..!!


आजच्या कवितेचा जो आशय आहे हा खरंतर प्रत्येकाला लागू होतो. आपण अनेकदा एखाद्या प्रसंगात फसतो आणि तेव्हा निर्णय घेणं कठीण होऊन बसतं. ह्याचं कारण म्हणजे, आपलं मन आपल्याला एक सांगत असतं पण हृदयाला ते पटत नसतं आणि ह्यात आपलं सारं आयुष्य फसतं. निर्णय चुकतात आणि आपण नंतर नुसताच पश्चात्ताप करत बसतो. नेमका हाच विचार मांडणारी माझी ही कविता.


द्वंद्व


द्वंद्व स्वतःचं स्वतःशीच असतं
विचारांचं वैर विचारांशीच असतं
चूक कुणाचीही नसते तरीही
हृदयाचं मनाशी कधीच पटत नसतं


मन आपुले वास्तववादी
हृदय प्रचंड आशावादी
निर्णय घेणं कायम कठीण असतं 
कारण हृदयाचं मनाशी कधीच पटत नसतं


हृदयाला सगळंच चांगलं दिसतं
मनाला मात्र ते चुकीचं वाटतं
ह्यात आपलं अख्ख आयुष्य फसतं
कारण हृदयाचं मनाशी कधीच पटत नसतं


हृदयाला पटकन ठेच लागते
मन तसं घट्ट असतं
कितीही प्रयत्न करा तरी
हृदयाचं मनाशी कधीच पटत नसतं..



- निनाद वाघ




No comments: