माणूस
परिस्थितीशी झुंज देणारा
असा माणूस व्हायला हवा..
आसवे गाळावे त्यांनीही
पण मानसिकरीत्या खंबीर हवा..
प्रत्येक प्रश्नांना उत्तर नसले तरीही
शोधायचा त्यांने प्रयत्न करावा..
मनात झालेला विचारांचा गुंता
अगदी अलगद असा सोडवून घ्यावा..
राग आला कितीही तरी
मनात त्याच्या क्रोध नसावा..
कठीण समय आला जरी
चेहरा कायम प्रसन्न असावा..
परिस्थितीशी झुंज देणारा
असा माणूस व्हायला हवा..
आसवे गाळावे त्यांनीही
पण मानसिकरीत्या खंबीर हवा..
- निनाद वाघ