Friday 17 June 2016

बंधन


जर एखाद्या पक्ष्याचे दोन्हीही पाय दोरखंडानं झाडाला बांधले आणि मग त्या पक्ष्याला गगनात भरारी घ्यायला सांगितले तर त्या पक्ष्याला ते शक्य होईल का?
बरं मग भरारी घेता येत नाही ह्यात चूक कोणाची? पाय बांधले त्या व्यक्तीची की त्या पक्ष्याची?
ह्यावर नक्की विचार करा कारण माणसांच्या आयुष्यात ही अनेकदा असंच घडतं की.
माणूस हा अनेकदा नात्यांच्या रूढी परंपरेच्या समाजातील प्रतिष्ठेच्या दोरखंडाने असा काही बांधला गेलेला असतो की स्वतःचं ध्येय गाठणं अन् महत्त्वकांक्षा पूर्ण करणं त्याला कठीण होऊन बसतं. तेव्हा दोरखंड तुटल्या वाचून पर्याय नसतो. पण ते देखील त्याला सहज शक्य नसतं कारण तोवर तो पूर्णतः नात्यांच्या बंधनात अडकून गेलेला असतो आणि म्हणूनच तो आपल्या ध्येयाच्या विरूध्द दिशेनं प्रवास सुरू करतो. इतरांना आनंदी ठेवताना स्वतः दुःख सहन करतो. त्रागा करतो. मग पुन्हा लोकं विचारात की इतकं सगळं छान असून देखील कायम दुःखी त्रासलेला का असतोस? तेव्हा त्याच्याकडे उत्तर नसतं आणि हे चक्र असंच सुरू राहतं.
बंधन तोडा. ध्येय गाठा. स्वप्न पूर्ण करा.


बंधन


कधीकधी मलाही वाटतं 
मनमोकळं वागावं..
तोडून सारी बंधनं
मनसोक्त जगावं..

पण बंधनं सारी मीच ठरवली
ती तोडू तरी कशी?
मर्यादा माझी मीच ठरवली
ती ओलांडू तरी कशी?

हेच कारण असेल कदाचित 
माझ्या अलिप्त राहण्याचं..
सुखात असून सुद्धा 
कायम दुरमुखलेला दिसण्याचं..

- निनाद वाघ




No comments: