Friday 1 April 2016

एक गुपीत आयुष्यचं..


नुकत्याच SSC परिक्षा संपल्या. आता दहावी नंतर पुढं काय ह्या पेचात अनेक मुलं असतात. काही वर्षांपूर्वी हाच प्रश्न मलाही पडला होता. निर्णय घेताना पार गोंधळ उडाला होता. त्या नंतर आयुष्यात असे अनेक क्षण आले. अनेक निर्णय घेतले. काही फसले तर काही अगदी अचूक ठरले. ह्या वरून मी एक गोष्ट शिकलो आणि नेमका हाच विचार मी माझ्या ह्या कवितेत मांडतो आहे. 


एक गुपीत आयुष्यचं..

समोर रस्ते चार होते
मार्ग कुठला निवडू कळेना..
निवडला एक मार्ग शेवटी
पण पावलं तिथे वळेना..

निवडताना तो रस्ता
सल्ले घेतले इतरांचे..
ऐकले नाही तेव्हा
आतून येणाऱ्या स्वरांचे..

प्रवास खडतर वाटू लागला
कायम संकटानी ग्रासलेला..
चहू बाजूने अंधार पसरला
कायम दुःखाने त्रासलेला..

एके दिवशी मग मी
एक दृढ निश्चय केला..
चार पावलं मागे वळत
प्रवास नव्यानं सुरू केला..

आता प्रवास सुकर झाला
जीवनात माझ्या आनंद आला..
दुःख सारे विरुन गेले
आयुष्य नव्याने उदयास आले..

आनंदी आयुष्याचं तुम्हाला गुपीत
सांगतो नीट ऐका जरा..
सल्ला देणारे भेटतील खूप
पण मनाला आवडेल तेच करा..

- निनाद वाघ




No comments: